सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

भारताच्या ६५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.



देवाला एकच विनंती, भारत देशाची आम्ही शाळेत घेतलेली

प्रतिज्ञा आम्हाला विसरु देऊ नको. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या

पानावर

मानाने विराजमान झालेल्या ह्या प्रतिज्ञेला आज मनातल्या

कुठल्या का होईना एखाद्या पानावर एक स्थान आहे,

ते असेच निढळ राहु देत.....


भारत माझा देश आहे।

सगळे भारतीय माझे बांधव आहेत।

माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा

आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे।

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे।

जय हिंद….. * जय भारत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा