शुक्रवार, १९ जुलै, २०१३

लग्न बंधन


दोन अनोळखी जीव
कधी न भेटलेले
वेगवेगळ्या वातावरणात
कुठेतरी वाढलेले
लग्न बंधनात अडकल्यावर
इतके एकरूप कसे होतात....

काहीच नातं नसतांना
रक्ताच्या नात्यापेक्षाही
इतके कसे एकजीव होतात
असं काय असतं या नात्यात
की हे नातं जन्माजन्माच वाटायला लागतं....

एकमेकांची काळजी
एकमेकांसाठी जगण्याची उर्मी
कोठून येत असेलं
काहीच नाही कळत...

पण हे असं घडतं खरं
हे नातच जगणं होऊन
आयुष्य या नात्यास अर्पण केलं जातं
म्हणून लग्न हे बंधन असलं तरी
एक अतूट अन गोड नातं असतं ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा